शहर उत्तरच्या आ.देशमुखांना राष्ट्रवादीने दिले गाजर

सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर व्हावी आणि बाहेरून येणारी वाहने परस्पर उड्डाणपलावरून बाहेर पडावीत यासाठी दोन उड्डान पुल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले होते. सोलापुरातील अनेक विद्यार्थी व नागरिक बाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांच्या अपघातात चिरडून ठार व जखमी झाले आहेत.या करिता तोडगा काढण्यासाठी हे उड्डाणपूल मंजूर केले होते. सदरच्या योजनेला महापालिकेचा 100 कोटीचा हिस्सा, महाराष्ट्र शासनाचा 200 कोटीचा हिस्सा आणि उर्वरित हिस्सा केंद्र शासनाकडून येणार आहे महापालिकेच्या 100 कोटी आणि शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या 200 कोटी असे एकूण 300 कोटी हिश्श्यातून जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश निघालेले होते .
सदर योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी महाराज चौकापासून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, तिथून जुनी मिल कंपाऊंड , तेथून रेल्वे स्टेशन, तेथून पत्रकार भवन इथपर्यंत वाहतुकीची कोंडी संपली असती! त्याचप्रमाणे दुसरे उड्डाणपूल हे जुन्या तुळजापूर पुना नाका पासून मार्केट यार्ड अलिकडच्या चौकातून जोड बसवण्णा पाणी टाकी समोरुन अशोक चौक पोलिस चौकी समोरून, गेंट्याल टॉकीज चौका समोरून आयुक्तालयासमोरून पत्रकार भवनापर्यंतची गर्दी व वाहतुकीची कोंडी संपली असती! हे मार्ग मंजूर झाले तेव्हा विजयकुमार देशमुख सोलापूर चे पालकमंत्री होते.पण त्यांच्या कार्यकाळा मध्ये सदर योजनेचा एक दगड देखील हलला नाही. हे उड्डाणपूल करण्यासाठी ज्या जमिनीवरून उड्डाणपूल होणे आवश्यक आहे ती जमीन ताब्यात घेण्यासाठी देखील त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही.
सदरच्या योजनेला मंजुरी मिळून सहा वर्षे झाली आहेत पण जमीन अधिग्रहणही नसताना याचे पूर्वी दोनदा काम करण्याचे टेंडर निघाले हा एक अजब नमुना म्हणावा लागेल! जागेवर जागाच नाही तर उड्डाणपूल बांधणार कुठे ? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे. यापूर्वीच्या दोन निविदा प्रसिद्ध झाल्या तेव्हा भाजपचा कुठलाही व्यक्ती त्याचे श्रेय घेण्याकरता पुढे आला नाही वा टेंडर प्रसिद्ध झाले याची सोलापूरकरांना माहिती देण्यासाठी कोणी पुढे आले नाही. परंतु मागची निवडणूक व आताची निवडणूक उड्डाणपुलाच्या नावाने जिंकण्याची ही नीती असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आमदार विजयकुमार देशमुख यांनी वीस वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये कुठलेही ठोस काम केलेले नाही हे लक्षात आल्यामुळे उड्डाणपुलाची तिसरी निविदा डिक्लेअर करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडुन केला आहे