
सोलापूर, दि.( )फोंडशिरस गावातील कृषी महाविद्यालय, बारामतीच्या कृषीकन्यांचे आगमन उत्साहात करण्यात आले.ग्रामीण शेतीविषयक कार्याचा अनुभव कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थिनींना गावात सामील होऊन कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी प्राप्त झाली आहे.
गावकऱ्यांनी विद्यार्थिनींना कृषी तंत्रज्ञान, शेतीविषयक आव्हाने आणि शेतीच्या बदलत्या चित्राबद्दल माहिती दिली. त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर,जैविक शेती,पाणी व्यवस्थापन, आणि नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल.कृषी विद्यार्थिनींच्या या निवासामुळे फोंडशिरस गावातील शेतकरी वर्गासाठी एक मोठा बदल घडवून आणण्याची आशा आहे. तसेच, विद्यार्थिनींद्वारे आपल्या शेतकरी कुटुंबीयांसाठी उपयोगी ठरतील अशा कार्यशाळा आणि चर्चासत्राचे आयोजन केले जाईल.
याप्रसंगी कृषीकन्या साक्षी सोनवणे, सानिका तारळकर,शैली भराड, वसुधा भोसले,खुशी खान,आदिती पुरवंत,अश्विनी देशमुख व किरण लिमण उपस्थित होत्या.कृषीकन्यांना संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड व एस. व्ही. बुरुंगळे तसेच गावचे सरपंच पोपट बाबा बोराटे, तलाठी विकास शिंदे,कृषी सहाय्यक हनुमंत खरात यांचे मार्गदर्शन लाभले.